Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

By
July 13, 2022 1 Min Read
Comments Off on इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – लोणावळाधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात झाली आहे. पुढील ४८ तासात इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत – जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून इंद्रायणी उगमस्थान तथा मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणीचे दोन्ही बाजूंचे घाट पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी (दि.१२) रात्री उशिरापर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी वाढत चालली होती. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना इंद्रायणी नदीकडे जाण्यास मज्जाव केला आहे. इंद्रायणीकडे जाणाऱ्या रस्त्यांना बांबूची लाकडे लावून रस्ता अडवला आहे.

Author

Follow Me
Other Articles
Previous

गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील 22 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस

Next

महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची बदली होणार?

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme